
दुसऱ्या टी 20i सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने फ्लॉप कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाने धर्मशालेतील तिसर्या आणि निर्णायक सामन्यात पलटवार केला आहे. टीम इंडियाने धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 118 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 25 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 15.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 120 धावा केल्या. टीम इंडियाने यासह हा सामना जिंकला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. तसेच टीम इंडियाने या विजयासह 2015 मधील पराभवाची परतफेड केली. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 2015 साली याच मैदानात पराभूत केलं होतं.
Leave a Reply