
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच एका सार्वजनिक सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन करून सर्वांचे लक्ष वेधले. संगमनेर येथे अमोल खताळ यांच्या मागणीनुसार एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) स्थापनेबाबत शिंदे यांनी सामंत यांच्याकडे विचारणा केली. “गृहनिर्माण विभाग आणि नगर विकास विभाग दोन्ही माझ्याकडे आहेत, आणि आता उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. मी अमोल खताळ यांच्या संगमनेरला आलो आहे आणि त्यांची एमआयडीसीची मागणी आहे. तुम्ही काय करणार?” असा प्रश्न शिंदे यांनी सामंत यांना विचारला.
यावर तात्काळ प्रतिक्रिया देत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पंधरा दिवसांपूर्वीच आपण संगमनेर येथे भेट दिली होती आणि तिथेच एमआयडीसी जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढील दोन महिन्यांत एमआयडीसीसाठी आवश्यक असलेले टू जी नोटिफिकेशन काढले जाईल, असे सामंत यांनी सांगितले. या निर्णयामुळे संगमनेर भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Leave a Reply