
आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या जीवनाबद्दल अनेक विचार मांडले आहेत. त्यात त्यांनी वैवाहिक जीवनाची रहस्यं देखील सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नुसार पत्नीचे काही दुर्गुण घरातील सुख-शांती नष्ट करु शकतात. एवढेच नव्हे तर ते पतीला कंगाल देखील करु शकतात.
पत्नी जर भांडखोर असेल तर घरातील वातावरण नेहमीच तणावाखाली रहाते. अशा घरात कधी सुख आणि समृद्धी येऊ शकत नाही. कारण भांडणामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते.
स्वत:च्या सौदर्याचा गर्व हाही महिलांचा दुर्गुण म्हटला जातो. अशा महिलांचे जीवन भौतिक बाबींनी जास्त प्रभावित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सौदर्याचा गर्व करणे चांगले नसते.
जर एखाद्या महिलेला दिखावा करण्याची सवय असेल तर ती पतीची संपत्ती आणि क्षमते पेक्षा जास्त खर्च करु शकते. त्यामुळे पतीचे आर्थिक नुकसान होऊन तो कंगाल होऊ शकतो.
घरात सतत अस्वच्छता असल्याने लक्ष्मी माता रुसते. त्यामुळे घरात साफ सफाई न करणारी स्री घरात दारिद्र्य आणू शकते असेही आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे.




Leave a Reply