• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब – प्रो. मझहर आसिफ

December 16, 2025 by admin Leave a Comment


“वसुधैव कुटुंबकम – सभ्यता संवाद” या विषयावर आधारित एका परिषदेचे आयोजन सेंटर फॉर स्टडीज इन इंटरनॅशनल रिलेशन्सने ( CSIR ) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली आणि MACAI, कोलकाता यांच्या सहकार्याने केले होते. मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ ( पहिला दिवस  ) रोजी झालेल्या या कार्यक्रमात एक उद्घाटन सत्र आणि तीन पूर्ण सत्रे झाली.

एआय आणि आयसीटीद्वारे तांत्रिक संपर्क असूनही, मानवतेला अजूनही हिंसाचार, संघर्ष आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करावा लागत आहे असे आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले. त्यांनी भारताच्या चिरस्थायी सभ्यतावादी जाणीवेवर भर दिला, जिने आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता हजारो वर्षांपासून एकता, शांती आणि सहअस्तित्व जोपासले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मूल्ये, संवेदनशीलता आणि सांस्कृतिक जाणीवेने प्रेरित होऊन सत्तेचा नैतिक वापर करण्याची गरज विशद केली.

वसुधैव कुटुंबकम हा केवळ तात्विक आदर्श नाही, तर समकालीन जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यावहारिक चौकट आहे असे आपल्या उद्घाटीय भाषणात बिहारच्या नालंदा विद्यापीठचे कुलगुरु प्रा.सचिन चतुर्वेदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की संकीर्ण आर्थिक निकषांच्या पलीकडे जाऊन शाश्वत वापर आणि उत्पादन, मजबूत पायाभूत सुविधा आणि मानवी कल्याणाचे व्यापक निर्देशक स्वीकारण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब

वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब आहे, जे ज्ञान, अध्यात्म आणि सर्वसमावेशकतेमध्ये रुजलेले आहे असे उद्घाटनपर सत्रात विशेष अतिथी म्हणून भाषण करताना जामिया मिल्लिया इस्लामियाचे कुलगुरू  प्रो. मझहर आसिफ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृती ज्ञानावर आधारित आहे, जी कठोर श्रद्धा प्रणालींऐवजी कुतूहल, संवाद आणि सहअस्तित्वाला प्रोत्साहन देते.

सांस्कृतिक एकात्मता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता या भारतीय संकल्पनांवर केंद्रित असलेल्या पूर्ण सत्रांमध्ये भारत आणि परदेशातील विद्वानांनी भाग घेतला. “सांस्कृतिक भारत” (ग्रेटर इंडिया) ही संकल्पना भौगोलिक सीमा ओलांडते आणि त्याच्या अंतर्निहित बहुलतेवर आणि ऐतिहासिकदृष्ट्या दडपलेल्या सांस्कृतिक मूल्यांना पुनरुज्जीवित करण्याचे महत्त्व यावर चर्चासत्रांनी भर दिला.

आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरील चर्चेत राज्यांच्या धोरणात्मक गणिते, प्रशासनातील कमतरता, दहशतवाद आणि हवामान संकट यासारख्या घटकांचा विचार करण्यात आला, ज्यामुळे जागतिक शांततेच्या नाजूकतेला वाढते.या चर्चांनी सर्व सहभागींना सखोल अंतर्दृष्टी प्रदान केली आणि व्यापक चिंतनासाठी भरपूर साहित्य प्रदान केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SA : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका चौथ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार
  • IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो, कोण जिंकणार?
  • हिवाळ्यात तुम्हीही स्वेटर घालून झोपता का? ही सवय पडू शकते महागात, आरोग्यावर होऊ शकतात विपरीत परिणाम
  • IPL Auction 2026 : आरसीबीने मिनी लिलावात खरेदी केले 8 खेळाडू, किती रक्कम मोजली ते जाणून घ्या
  • IPL 2026 Mini Auction मधील 5 महागडे खेळाडू, 2 अनकॅप्ड भारतीयांचा धमाका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in