• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठे संकट येणार ? पर्वत झाले बर्फावाचून उघडे बोडके, ग्लोबल वार्मिंगचा असाही फटका

November 28, 2025 by admin Leave a Comment


बदलत्या हवामानाचा परिणाम आता हिमालयाच्या पर्वतावंर दिसत आहे. जे पर्वत वर्षभर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले असायचे ते आता पूर्णपणे काळे दिसत आहेत. हवामानाच्या या बदलत्या परिस्थिती सततच वाढत चाललेले तापमान जबाबदार मानले जात आहे. जर असाच प्रघात सुरु राहिला तर येणाऱ्या काळात खूपकाही बदलून जाणार आहे. हायर हिमालयात बराच काळ बर्फवृष्टी झालेली नाही. त्यामुळे १५ हजार अधिक फूट उंचावरील कड्यांवर देखील बर्फ नसल्याने तो उघडे बोडके आणि काळे दिसत आहेत.

10 वर्षात 3 डिग्री वाढले तापमान –

बर्फवृष्टी न झाल्याने ग्लेशियर वेगाने वितळत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या तुटण्याचा वेग देखील वाढला आहे. या भागात जरी कडाक्याची थंडी असली तरीही पर्वतांवर बर्फ दिसणे दुर्मिळ झाले आहे. हिमालय हा जगातील सर्वात उंच पर्वत श्रेणीत येतो. एवढेच नव्हे तर तो संवेदनशील देखील म्हटला जातो. तरी येथे गेल्या दहा वर्षात 3 डिग्रीने तापमान वाढले आहे. वाढत्या पाऱ्याचा हा वेग जगात सर्वाधिक हिमालय क्षेत्रात आहे.

येणारा काळ घातक ?

ज्येष्ठ संशोधक डॉ. पी.सी. तिवारी यांनी सांगितले की ज्या वेगाने हिमालयाच्या रेंजमध्ये पर्यावरण बदलत आहे. त्याचे परिणाम येत्या काळात खूपच घातक होऊ शकतात. ग्लोबल वार्मिंगमुळे दर वर्षी हिमालयाच्या पर्वत श्रृंखला १० मिलीमीटर वेगाने वरती जात आहेत. एवढेच नाही तर हिमालय जगातील जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या विभागही आहे. त्यामुळे या भागातील कोट्यवधी लोकांना अडचणी येऊ शकतात. हिमालयाच्या रेंजमध्ये प्रचंड निर्माण कार्य सुरु असल्याने देखील हा बदल झाला आहे. गरजेपेक्षा जास्त मनुष्याच्या हस्तक्षेपाने पर्यावरण प्रभावी झाले आहे.

दरवर्षी गंगोत्री ग्लेशियर १५ मीटर मागे सरकतेय

गंगोत्री ग्लेशियर दरवर्षी १५ मीटर मागे सरकत चालले आहे. केंद्र सरकारात पर्यावरण मंत्रालयाचे सचिव राहिलेले हेम पांडे यांच्या मते हिमालयाचे सर्वाधिक शोषण होत आहे.अतिप्रमाणात बांधकामे केल्याने हिमालयाचा नकाशाच बदलला आहे. हिमालयात गेल्या २० वर्षात १५ टक्के पावसाची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई झाली आहे. गेल्या १० वर्षात मध्य हिमालयातील दोनशेहून अधिक जलस्रोत संपूर्णपणे सुखले आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्यादृष्टीने काही प्लानिंग झाली नाही तर शेती, रोजगारासह मनुष्याच्या आरोग्याची याची किंमत मोजावी लागेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
  • IND vs SA : चौथ्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू मालिकेतून आऊट
  • …तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्याचं खळबळ उडवून देणारं विधान!
  • Netflix पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतेय ‘ही’मजेदार वेब सीरिज…
  • 501 वर्षांनंतर सफला एकादशीला मोठा योगायोग, या दिवशी अवश्य करा ‘हे’ विशेष उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in