• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! बांगलादेशचा भारताला दणका, महत्त्वाची सेवा केली बंद, हजारो भारतीयांना फटका बसणार

December 22, 2025 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अस्थिरता आहे. भारताच्या या शेजारील देशात जाळपोळ आणि हिंसक आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढला आहे. रविवारी भारताने बांगलादेशातील चितगाव येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्र (IVAC) येथील व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी निलंबित केल्या होत्या. त्यानंतर आता बांगलादेशने भारताला मोठा दणका देत बांगलादेश उच्चायोगाने भारतीयांसाठी व्हिसा सेवा निलंबित केल्या आहेत. याचा फटका हजारो भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताकडूनही व्हिसा सेवा बंद

रविवारी भारताने बांगलादेशातील खुलना, राजशाही आणि चितगाव येथील व्हिसा सेवा निलंबित केल्या होत्या. याआधी चितगावमध्ये हिंसक निदर्शने झाली होती, त्यावेळी आंदोलकांनी व्हिसा कार्यालयावर दगडफेक केली होती. यामुळे भारताने सेवा थांबवल्या होत्या, त्यानंतर आता बांगलादेशानेही नवी दिल्लीतील सेवा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश उच्चायोगाने हा निर्णय घेतला आहे.

शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर भारताविरोधात घोषणाबाजी

बांगलादेशने भारताच्या व्हिसा सेवा निलंबित करण्याच्या या निर्णयाकडे बदला म्हणून पाहिले जात आहे. याचा भारतीय नागरिकांवर परिणाम होणार आहे. भारतातून बांगलादेशात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे, फक्त पत्रकार आणि काही व्यावसायिक या देशात भेट देत असतात, मात्र आता अशा लोकांनी बांगलादेशात प्रवेश करता येणार नाही. बांगलादेशमधील युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसक आंदोलन झाले होते, यात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, त्यामुळे भारताने व्हिसा सेवा निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता.

हादीची हत्या कशी झाली?

ढाकाच्या बिजॉयनगर भागात 12 डिसेंबर रोजी निवडणूक रॅलीदरम्यान मास्क लावलेल्या काही हल्लेखोरांनी हादी यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते, मात्र गुरुवारी त्यांचे निधन झाले. हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसाचार उसळला होता, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. हादीच्या अंत्यसंस्कारादरम्यान जमावाने भारतविरोधी घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. आता दोन्ही देशांनी एकमेकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वे भाडेवाढ करणे सक्तीचे आहे की गरज आहे? खिशावर ओझे टाकण्याचे खरे कारण जाणून घ्या
  • महिलांमध्ये पुरूषांपेक्षा 3x जास्त डोकेदुखी प्रमाण ‘या’ मुख्य कारणांमुळं वाढलंय… एका क्लिक वर जाणून घ्या
  • नाताळ सणानिमित्त चुकूनही देऊ नका भेट म्हणून ‘हे’ गिफ्ट, नाहीतर तुमच्या जीवनात निर्माण होतील असंख्य समस्या
  • अमेरिकेचे 1 लाख डॉलर पाकिस्तानात किती होतील ? धक्कादायक आकडा पाहा
  • पॅन-आधारबाबत मोठी बातमी! 31 डिसेंबरपूर्वी लिंक न केल्यास थेट दंडात्कमक कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in