
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे हृदय बंद पडते. सोबतच इतरही अवयव काम करण्याचं थांबवतात. त्यानंतर हळूहळू शरीरावर सूक्ष्मजीव हल्ला करतात आणि शरीराचा दुर्गंध यायला लागतो. पण मानवी शरीरात असा एक भाग असतो जो बराच वेळ जिवंत असतो.
मानवाचा मृत्यू होत असतो तेव्हा शरीरातील प्रत्येक अवयव मृत्यूला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मृत्यू जवळ आल्याने प्रत्येक अवयवाची ही लढाई संपुष्टात येते आणि हेच अवयव नंतर काम करणं बंद करतात. शरीरातील एक भाग मात्र हृदय बंद पडल्यानंतरही काम करतच राहतो.
या भागाचे नाव आहे मानवी त्वचा. जेव्हा हृदय, फुफ्फुस, मेंदू, मूत्रपिंड किंवा इतर अवयव काम करायचं बंद करतात तेव्हा माणसाच्या मृत्यूनंतर त्याची त्वचा मात्र तिचे काम करतच असते. त्वचेमध्ये असणाऱ्या पेशी लवकर मरत नाहीत. त्या काही काळासाठी जिवंतच असतात.
इतर अवयवांच्या तुलनेत त्वचेला ऑक्सीजन कमी लागतो. त्वचेला तत्काळ ऑक्सिजनची गरज नसते. त्यामुळेच मृत्यूनंतर पुढचे काही तास, कधीकधी तर मृत्यूनंतर 24 तास त्वचेमधील पेशी त्यांचे काम करत असतात. वातावरणातील आर्द्रतेला शोषून त्वचेवरच्या पेशी जमा केलेल्या उर्जेच्या जिवावर जिवंत असतात.
त्यामुळेच देहदानाच्या प्रक्रियेदरम्यान उशीर झाला तरीही व्यक्तीची त्वचा सुरक्षितपणे काढता येते. तसं म्हणायचंच झालं तर मानवी त्वचा ही शरीरावरील शेवटचा शिपाई असते. ती शेवटपर्यंत मृत्यूला हरवण्यासाठी लढत असते. (इंटरनेटवर उबलब्ध असलेल्या माहितीवर ही स्टोरी आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा)




Leave a Reply