• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिलेच्या स्वप्नात साप येताच अख्खं गाव हादरायचं, बरोबर 2 दिवसांनी घडायची महाभयंकर घटना, तब्बल 14 वेळा..

December 14, 2025 by admin Leave a Comment


काही अशा घटना घडत असतात ज्यावर विश्वास देखील ठेवला जाऊ शकत नाही, मात्र अशा घटना वास्तवात घडलेल्या असतात. अशीच एक घटना झाशी जिल्ह्यातल्या चिरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पट्टी कुमर्रा गावामध्ये घडली आहे. ज्या व्यक्तीसोबत हे सर्व घडलं आहे, त्या व्यक्तीचं आयुष्य एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाहीये. सीताराम अहिरवार असं या 75 वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना गेल्या 42 वर्षांमध्ये तब्बल 14 वेळा सापाने चावा घेतला आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे 14 वेळेला सापानं चावा घेऊन देखील प्रत्येकवेळी या घटनेतून ते सुखरूप बचावले आहेत. या घटनेची चर्चा केवळ त्यांच्या गावातच नाही, तर आता संपूर्ण जिल्ह्यात देखील चांगलीच रंगली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सीताराम हे झाशी जिल्ह्यातल्या पट्टी कुमर्रा गावचे रहिवासी आहेत, ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेबाबत माहिती देताना स्वत: सीताराम यांनी सांगितलं की, जे जेव्हा 25 वर्षांचे होते, तेव्हा त्यांना पहिल्यांदा सापाने दंश केला होता. त्यानंतर त्यांना गावामध्ये असलेल्या खैरापती मंदिरामध्ये नेण्यात आलं, त्यानंतर त्यांच्यावर तिथे काही उपचार करण्यात आले आणि या घटनेतून त्यांचा जीव वाचला. एवढंच नाही तर त्यांनी असा दावा देखील केला आहे की, जेव्हा -जेव्हा त्यांना सापाने चावा घेतला, त्यापूर्वी दोन दिवस आधी आपली पत्नी दिलकुवंर हिच्या स्वप्नात साप येतो, आणि त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी सर्प दंशाची घटना घडते.

जेव्हा -जेव्हा सीताराम यांची पत्नी दिलकुवंर यांच्या स्वप्नात साप येतो, तेव्हा -तेव्हा सीताराम यांचं संपूर्ण कुटुंब दहशतीच्या छायेत असतं, कारण त्यांच्या स्वप्नात साप येणं हे आता सीताराम यांना दोन दिवसांनंतर साप चावा घेणार आहे, याचा संकेतच बनला आहे, संपूर्ण कुटुंबच नाही तर गावात देखील भीतीचं वातावरण असतं. एवढंच नाही तर येथील ग्रामस्थांच्या वतीनं असा देखील दावा करण्यात आला आहे की, जेव्हा-जेव्हा सीताराम यांच्या पत्नीला असं स्वप्न पडतं, तेव्हा सीताराम यांना अत्यंत सुरक्षित जागी ठेवलं जातं, मात्र तरी देखील त्यांना कोणत्या न कोणत्या प्रकारे बरोबर दोन दिवसांनी सर्पदंश होतोच. अशी घटना एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 14 वेळा घडली आहे, त्यामुळे आता गावासह जिल्ह्यात देखील या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री..; ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचा साखरपुडा, होणारा पती कोण?
  • शेंगदाणे खात होती चार वर्षांची चिमुकली, घशात शेंगदाणा अडकला आणि अखेर….
  • चेहऱ्यावर येईल चकाकी, रात्री झोपण्यापूर्वी फॉलो करा ‘ही’ Night Skin Care Routine….
  • Mumbai Local Megablock : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक, लोकल सेवा पूर्णपणे बंद, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
  • प्रसिद्ध अभिनेत्याने 30 व्या वर्षी संपवलं जीवन, लेकाला अशा अवस्थेत आईने पाहिलं आणि…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in