• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, आमदार दीपक केसरकर यांचं मोठं विधान

November 29, 2025 by admin Leave a Comment


राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये अनेक नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये थेट सामना आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. पण सिंधुदुर्गात महायुतीतील या दोन पक्षांमधील तणावाने टोक गाठलं आहे. शिवसेना-भाजपचे स्थानिक नेते परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी एक मोठं विधान केलं. “महाराष्ट्रातील युती ही दिल्लीमधून ठरली आहे. त्यामुळे जनमताचा आदर केला पाहिजे. जनतेच्या कौलाबरोबर राहीलं पाहिजे असं मला वाटतं. पैसे वाटप करण्याचा चुकीचा पायंडा सिंधुदुर्गात पाडला जात आहे” असा आरोप दीपर केसरकर यांनी केला. “मालवण बरोबरच सावंतवाडीमध्ये सुद्धा जोरदार पैशाचे वाटप होत आहे. पुढच्या काळात निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल” असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं. ‘पैसे देऊन मतदान करून घेणारे विकास काय करणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. त्यांनी युती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता” असं दीपक केसरकर म्हणाले. सावंतवाडीतील राजघराण्यातील असलेले भाजपचे उमेदवार श्रद्धाराजे भोसले त्यांच्या घराण्यावर आमदार दीपक केसरकर यांनी आरोप केलेत. “सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकलं नाही. याचा दोष संपूर्ण राजघराण्यावर जातो. राजघराण्याने बदली जागा मागितली होती. तो सुद्धा मी कॅबिनेटमधून प्रस्ताव मंजूर करून आणला.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात जमीन देऊ केली आहे. पण केवळ तांत्रिक बाबीसाठी पाच वर्ष अडवून ठेवलय” असा केसरकर यांनी आरोप केला.

मोती तलाव हे सावंतवाडीचे भूषण

“बजेट मंजूर असून टेंडर देखील झालय.राजघराण्याला लोकहिताची काळजी होती, तर त्यातून त्यांनी मार्ग काढायला हवा होता. शासनाची 50% जागा दिल्यानंतर अडवून ठेवणं सपशेल चुकीचं आहे. मोती तलाव हे सावंतवाडीचे भूषण आहे.
मोती तलाव हे आपल्या मालकीचा आहे अशी केस राजघराण्याने घातली आहे. त्यांच्याच घरातील व्यक्ती नगराध्यक्षपदी बसेल. मोती तलाव नगर परिषदेच्या मालकीचा राहील की नाही असा प्रश्न निर्माण होतो.सावंतवाडीतील प्रत्येक सुजाण नागरिकांनी विचार करावा” असं दीपक केसरकर म्हणाले.

वेंगुर्लेवासियांना कुणी विकत घेऊ शकत नाही

“पैशाने मते विकत घेणे हा मोठा पराक्रम नसतो. मागच्या वेळेला त्यांनी पैसे वाटले. म्हणून आमचा पराभव झाला.
कुणी किती पैसे वाटले तरी वेंगुर्लेवासियांना कुणी विकत घेऊ शकत नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
  • आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते..; ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा कडक ट्रेलर
  • राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीचे उद्घाटन, भारतीय शूर वीरांच्या छायाचित्रांनी घेतली ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या फोटोंची जागा
  • स्वतःच्या ‘या’ 7 वस्तू दुसऱ्यांना कधीच देऊ नका? आयुष्यात येतील अडथळे
  • जिल्हापरिषद निवडणुकीआधी कायद्यात मोठा बदल, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 सर्वात मोठे निर्णय!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in