
काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनेक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस सोडून अन्य पक्षांमध्ये, विशेषतः भाजपामध्ये जात असल्याचे ते म्हणाले. लोकांना काँग्रेसमध्ये आपले किंवा पक्षाचे भवितव्य दिसत नाहीये, तसेच नेतृत्वाला राज्यात दिशा नसल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले. निवडणुकांमध्ये पक्षाचा सातत्याने पराभव होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
चव्हाण यांनी स्पष्टपणे म्हटले की, नाना पटोले यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळेच काँग्रेस डबघाईस आली आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे यापूर्वी राज्यातील सरकार अडचणीत आले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. काँग्रेसने नेमलेल्या समितीकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच, आगामी निवडणुकांसाठी जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारालाच तिकीट देण्यावर त्यांनी भर दिला. भाजप आणि शिवसेनेच्या मुंबईतील चर्चेचे स्वागत करत राष्ट्रवादीसोबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply