• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एका झाडाखाली दिवा लावण्यात आला? या विधीचा अर्थ नेमका काय?

November 28, 2025 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधला सर्वांचा आवडता अभिनेता, सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता धर्मेंद्र यांनी काल 25 नोव्हेंबर 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत जणू काही सन्नाटा पसरला आहे. अजून सगळे धक्क्यातच आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांना प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरातही त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. मात्र त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी या जगातून एक्झीट घेतली आहे.

स्मशानभूमीतील एका झाडाखाली दिवा लावण्यात आला

धर्मेंद्र यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक कलाकार स्मशानभूमीत उपस्थित होते. त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आले होते? या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. परंतु एका व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ते म्हणजे धर्मेंद्र यांच्या निधनाची अधिकृत बातमी बाहेर येण्यापूर्वीच त्यांच्या मुलीने हातात पेटता दिवा घेत तो झाडाखाली एका कोपऱ्यात ठेवल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून आलं. पण हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. पण त्यामागे अध्यात्मिक काही अर्थ असेल का? असा प्रश्नही हा व्हिडीओ पाहून अनेकांना पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namaste Bollywood (@namastebollywood.in)

मृत्यूनंतर दिवा पेटवणे हे हिंदू धर्मात फार महत्त्वाचा विधी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये “स्मशानभूमी” असं लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला एक पेटता दिवा हातात घेऊन येते आणि तो ती झाडाखाली एका कोपऱ्यात ठेवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमधील ही महिला धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची मुलगी असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, एखाद्याच्या मृत्यूनंतर दिवा पेटवणे हे हिंदू धर्मात फार महत्त्वाचा विधी मानला जातो.

हा दिवा का लावला जातो?

ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धांमधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले की मृत्यूनंतर घराच्या दारावर दिवा लावणे हे सहसा “पूर्वजांना शांती देण्यासाठी” केले जाते. हा दिवा मृत आत्म्याच्या पुढील प्रवासाला प्रकाश देण्यासाठी, सुरळीत मार्ग सुनिश्चित करण्यासाठी आणि अंधारापासून दूर राहण्यासाठी लावला जातो. हा दिवा किंवा त्याचा प्रकाश व्यक्तीला पुढे जाण्याचे मार्गदर्शन करतो असे म्हटले जाते. हा दिवा बहुतेकदा 13 दिवस सतत जळत ठेवला जातो, ही प्रथा अखंड ज्योती म्हणून ओळखली जाते. तथापि, ही प्रथा स्थानानुसार थोडी फार बदलू शकते.

 

 





Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अजित दादांनी डाव टाकला, भाजपसह शिवसेनेलाही दणका, राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी अपडेट!
  • Ambani : अंबानींच्या शाळेत शिकवतात किती शिक्षक ? पगार किती ? कशी मिळते ॲडमिशन ? जाणून घ्या एका क्लिकवर
  • नोकरीच्या मुलाखतीची तयारी कशी कराल? हमखास विचारले जातात ‘हे’ प्रश्न
  • Prithviraj Chavan: Operation Sindoor मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव; पृथ्वीराज चव्हाण हे काय बोलून गेले? अशी मुक्ताफळं उधळली तरी का?
  • Realme Narzo 90x 5G आणि Narzo 90 हे स्मार्टफोन भारतात झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि अद्भूत फिचर्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in