• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?

November 28, 2025 by admin Leave a Comment


बहुतेक घरांमध्ये, महिला या जॉबमुळे, किंवा वेळेआभावी सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. किंवा त्या कणकेच्या रोट्या, चपात्या आदल्या रात्रीच बनवल्या जातात आणि  दुसऱ्या दिवशी खाल्ले जातात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काहीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता, परंतु ते जास्त वेळ ठेवणे आणि नंतर ते खाणे खूप हानिकारक मानले जाते. त्याच पद्धीतीने मळलेले पीठ रेफ्रिजरेटरमध्ये किती काळ चांगले राहते आणि ते कधी खाऊ नये? तसेच रोजच फ्रिजमध्ये मळलेले पीठ ठेवणे योग्य आहे का हे देखील जाणून घेऊयात.

पोषक घटक

गव्हाच्या पिठामध्ये प्रथिने, स्टार्च, फायबर, बी-व्हिटॅमिन, फॉलिक अॅसिड, नियासिन आणि रिबोफ्लेविन, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतात. पीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि भारतीय घरांमध्ये रोट्या, पराठे आणि पुरी बनवण्यासाठी वापरले जाते. तथापि, जर तुम्ही मळलेले पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर तुम्ही ते खाऊ नये. कारण ते कोणतेही पौष्टिक मूल्य शरीराला देत नाही.

पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने काय होते?

पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने आणि नंतर ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. पीठात रसायने तयार होऊ लागतात, जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. पीठात अनेक हानिकारक जीवाणू देखील वाढू शकतात.

पोटदुखी : बराच काळ साठवून ठेवलेले पीठ खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. पीठात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

आम्लपित्त : मळलेले पीठ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने मायकोटॉक्सिन तयार होतात, ज्यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होते.

पोषण: रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले पीठ फक्त खाण्यायोग्य असते. ते कोणतेही आरोग्यदायी फायदे देत नाही. ते त्याचे निरोगी पोषक घटक गमावते.

काय करायचं

जर तुम्ही सकाळी रेफ्रिजरेटरमध्ये कणिक ठेवत असाल तर ते करणे थांबवा. पीठ मळल्यानंतर कणिक अगदी 15 मिनिटांपर्यंत ठेवावी, त्यानंतर लगेच त्याच्या पोळ्या किंवा रोट्या बनवून खाव्यात.  रेफ्रिजरेटरमध्ये मळलेले पीठ ठेवाचंच असेल तर ते  1 ते 2 तासच ठेवा. रेफ्रिजरेटरमध्ये यापेक्षा जास्त काळ ठेवू नका. ते खाल्ल्याने समस्या निर्माण होतील. तसेच, जर पीठ काळे दिसत असेल किंवा त्याला वास येत असेल तर ते अजिबात खाऊ नका.

 

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Uddhav Thackeray : ठाकरेंनी घेतली नार्वेकर अन् राम शिंदेंची भेट, विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवरून काय ठरलं? 2 दिवसांत…
  • Sanjay Raut: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेयत…संजय राऊतांचा गर्भित इशारा कुणाला? महाविकास आघाडीला ‘मनसे’ भगदाड पडणार?
  • नागार्जुनच्या दुसऱ्या पत्नीमुळे मोडला असता रजनीकांत यांचा संसार, अमालाच्या प्रेमात थलायवाने उचलेलं मोठं पाऊल
  • Anmol Bishnoi : गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून पकडून भारतात आणलं, पण…केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याच्याबाबतीत घेतला एक मोठा निर्णय
  • कोणत्या लोकांची उंची अचानक कमी होते? ‘ही’ समस्या उद्भवू शकते? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in