• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चांदीच्या कड्याचे आहेत फायदेच फायदे, अस्थिर मन होईल शांत, कोणते ग्रह होतात मजबूत?

December 27, 2025 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रामध्ये चांदीचं विशेष महत्त्व आहे. चांदीचा संबंध हा चंद्र ग्रहाशी असतो. चंद्र हा ग्रह मन, भावना, मानसिक शांती यांचं प्रतिक आहे. ज्यांचा चंद्र ग्रह कमजोर असतो, अशा लोकांना चांदीची एखादी वस्तू हातात घालण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. मग ही चांदीची वस्तू कोणतीही असू शकते, चांदीची चेन, अंगठी किंवा चांदीचं कडं. चांदीच्या कड्याबाबत बोलायचं झाल्यास चांदीच्या कड्याला हातत घालणं हे ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानलं जातं. आज आपण चांदीचं कडं हातात घातल्यामुळे नेमकं काय होतं? चांदीचं कडं हातात कोणी घालावं? त्याची योग्य पद्धत काय? चांदीच्या कड्यामुळे नेमके काय फायदे होतात? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चांदीचं कडं हातात घालण्याचे अनेक फायदे आहेत.

चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित

ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध हा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी असतो, त्यामुळे तुम्ही जर तुमच्या हातात चांदीचं कडं घातलं तर तुमचे दोन ग्रह मजबूत होतात. जर तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर असं मानलं जातं की तुमचा चंद्र ग्रह कमजोर आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या हातात चांदीचं कडं घातलं तर तुमचा चंद्र ग्रह मजबूत होतो, आणि तुमच्या मनातील निगेटिव्हिटी दूर होऊन, सकारात्मक विचार येतात. तसेच चांदीच्या कड्यामुळे तुमचा शुक्र ग्रह देखील मजबूत होतो. जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो, तेव्हा तुमच्या यशाचा मार्ग खुला होतो, तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतात, कामात, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यावसायात यश मिळतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चद्र ग्रह हा तुमच्या मनावर परिणाम करणारा सर्वात प्रभावी ग्रह आहे, अशा स्थितीमध्ये चांदीच्या शितलतेमुळे तुमचं मन स्थिर राहण्यास मदत होते. तुमच्या मनावरील सर्व तणाव दूर होतो.

या राशीसाठी फायदेशीर

तुम्ही अनेकदा पाहायलं असेल की अनेक जण हातामध्ये चांदीचं कडं घालतात, त्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे चांदीमुळे तुमचं आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते, आरोग्याच्या समस्या दूर होतात. तसेच चांदीचं कडं जर तुम्ही नियमित वापरत असाल तर धनाची देवी लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते. कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींच्या लोकांनी चांदीचं कडं आपल्या हातात घालणं शुभ मानलं गेलं आहे. चांदीचं कडं हे पुरुषांनी नेहमी डाव्या हातात घालावं, तर महिलांनी उजव्या हातात घालावं असं ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Railway: भारताचे एकमेव रेल्वे स्टेशन, जिथं प्लॅटफॉर्म तिकीट नाही दाखवावा लागतो पासपोर्ट, नाव ऐकून बसेल धक्का
  • Chanakya Niti : प्रामाणिक माणसाची पारख कशी करावी? चाणक्य म्हणतात…
  • Salman Khan Fitness: वयाच्या 60 व्या वर्षीही वर्कआउट, सलमानचा संपूर्ण दिनक्रम जाणून घ्या
  • हिवाळ्यात चेहऱ्यावरील कोरडेपणा वाढतो, पार्टीसाठी 2 मिनिटांत चेहरा कसा उजळायचा? जाणून घ्या
  • Battle of Galwan: ‘जख्म लगे तो मेडल समझना’, अंगावर काटा आणणारा सलमानच्या चित्रपटाचा टीझर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in