• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता पोटदुखीच्या समस्या होतील छूमंतर…. गरम पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ

November 28, 2025 by admin Leave a Comment


आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर थेट आणि मोठा परिणाम होत आहे. धावपळीचे आयुष्य, वेळेअभावी चुकीच्या सवयी, अनारोग्यकारक खाणे आणि सततचा ताण या सगळ्यामुळे शरीर कमकुवत होत जाते. याचा सर्वात पहिला परिणाम पचनसंस्थेवर दिसतो, आणि त्यातून बद्धकोष्ठतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांना यामुळे अस्वस्थता, जडपणा आणि मानसिक तणावही जाणवू शकतो. पचनाचा त्रास सुरू झाल्यावर दैनंदिन आयुष्यही कठीण होते. हे सहज ठीक होत नाही, पण आयुर्वेदात यावर अनेक नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दुधासोबत त्रिफळा पावडरचे सेवन. त्रिफळा पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी प्रसिद्ध आहे.

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा त्रिफळा पावडर मिसळून प्यायला, तर हे मिश्रण तुमचे पोट नैसर्गिकरीत्या साफ करते. नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठतेत मोठा फरक जाणवतो. फक्त पचनच नव्हे त्रिफळामुळे प्रतिकारशक्ती वाढते, शरीर हलके वाटते आणि त्वचेवरही चांगला परिणाम दिसतो. हा उपाय साधा, नैसर्गिक आणि नियमितपणे अवलंबता येण्यास योग्य आहे. आयुर्वेद तज्ञांच्या मते, आयुर्वेदाचा शतकानुशतके जुना खजिना असलेला त्रिफला आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतो.

त्रिफळा हे आवळा, हरड आणि बहेडा या तीन फळांचे मिश्रण आहे. या तिन्ही गोष्टींचे मिश्रण केवळ चवच नव्हे तर पोट आणि पचनसंस्था स्वच्छ आणि मजबूत करण्यातही चमत्कार करते. आवळा जीवनसत्त्व ‘क’चा खजिना आहे. हे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि पोटात जळजळ आणि संसर्गाशी लढते. जेव्हा आवळ्याचा समावेश त्रिफळामध्ये केला जातो तेव्हा ते नैसर्गिक मार्गाने शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. हरड चवीला कडू असतो, परंतु आतड्यांमध्ये जमा झालेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या लगेच कमी होतात. तर बहेडा चवीला किंचित आंबट आणि कडू असतो आणि यामुळे पोटातील जीवाणू आणि हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात. याचे सेवन केल्याने आतड्यांची स्वच्छता होते आणि पचनसंस्था मजबूत होते. वैज्ञानिक संशोधनानुसार, त्रिफळामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स पोटाची जळजळ कमी करतात, आतड्यांमधील निरोगी बॅक्टेरिया वाढवतात आणि शरीरातून हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. हेच कारण आहे की जर ते नियमित घेतले तर बद्धकोष्ठता, गॅस, पोटदुखी यासारख्या समस्या कमी होतात.

त्रिफळा पावडरच्या स्वरूपात पाण्याबरोबर घेतले जाऊ शकते किंवा रात्री दुधात विरघळवून प्यायले जाऊ शकते. आयुर्वेदात ते अमृतासारखे मानले गेले आहे, कारण दुधाबरोबर घेतल्यास त्रिफळाची शक्ती वाढते आणि पचनशक्ती अधिक मजबूत होते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक याचे सेवन करू शकतात. हे पोट स्वच्छ करण्यास तसेच अंतर्गत अवयव निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. आयुर्वेदानुसार, त्रिफळ शरीराचे वात, पित्त आणि कफ या तीन दोषांना संतुलित करते, ज्यामुळे शरीर निरोगी होते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL Auction 2026 Live Streaming: 350 खेळाडू 77 जागा आणि 235.77 कोटींचं बजेट, जाणून घ्या सर्वकाही
  • ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्याला बेदम मारहाण… रक्तबंबाळ अवस्थतील धक्कादायक व्हिडीओ समोर…
  • स्वप्नात वाघ दिसणे शुभ असते की अशुभ? स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ काय?
  • लग्न लावून फसवणूक करीत लुटमार करणाऱ्या टोळीची तोडफोड, नवरदेवाच्या बापाचेही केले अपहरण
  • IPL Auction 2026 : आयपीएल लिलावात 5 अज्ञात खेळाडू खाणार भाव, वैभव सूर्यवंशीसारखी आहे छबी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in