• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंत्ययात्रा न काढताच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार घाईत का केले? अखेर हेमा मालिनी यांनी सांगितलं खरं कारण

December 1, 2025 by admin Leave a Comment


ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी मुंबईत निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. धर्मेंद्र बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या निधनाची बातमी देखील पसरली. देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा देखील ठेवण्यात आली. मात्र, या प्रार्थना सभेला हेमा मालिनी किंवा त्यांच्या दोन्ही मुली पोहोचल्या नव्हत्या. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे निधन झाले किंवा कुठे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार याबाबतची कोणतीही माहिती लोकांना देओल कुटुंबाकडून देण्यात आली नाही. यामुळे लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला.

धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल सर्वकाही गोष्टी इतक्या लपून का करण्यात आल्या, याबद्दल अखेर मोठा खुलासा करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर नुकताच, हमद अल रियामी यांनी हेमा मालिनी यांची भेट घेतली. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल आणि त्यांच्या अंत्यसंस्कारबद्दल इतकी गुप्तता का पाळण्यात आली हे सांगितले आहे.

याबद्दलचा खुलासा स्वत: हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबत बोलताना केला. अरबी भाषेत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, धर्मेंद्र हे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांना भेटायला गेलो होतो. यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या, ज्या मला जाणवल्या. हेमा मालिनी यांनी हमद अल रेयानी यांना बोलताना सांगितले की, धर्मेंद्र यांनी पूर्ण आयुष्यभर याची काळजी घेतली की, त्यांना आजारी अवस्थेत कोणी बघू नये.

ते कायमच आपले दु:ख लपवत होते. हेच नाही तर अत्यंत जवळचा व्यक्ती गेल्यानंतरही त्यांनी आपले दु:ख कधी दिसू दिले नाही. शेवटी निर्णय कुटुंबावर असतो. यावेळी बोलताना हेमा मालिनी यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पुढे हमदने लिहिले की, तो निर्णय ठिकच होता. हमीद तू त्यांची स्थिती बघू शकला नसताना असेही हेमा मालिनी यांनी म्हटले. पण जे काही असेल त्यांच्याबद्दलची माझे प्रेम कधीच कमी होणार नाही किंवा त्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावरील कमी होणार नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ambadas Danve : बाण-पंजा एक साथ…शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, ‘द मुरुड फाईल्स’ म्हणत दानवे यांचं शिंदे सेनेवर टीकास्त्र
  • Akshaye Khanna and Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिच्यासाठी अक्षय खन्नाची बोल्ड कमेंट… तुम्ही पागल लोकांसारखं तिला फक्त…
  • Dhurandhar Aditya Dhar : 280 कोटींच्या ‘धुरंधर’ चा दिग्दर्शक आदित्य धर किती श्रीमंत ? नेटवर्थ ऐकून..
  • Ambernath Firing : निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार… भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार अन्…
  • Imtiaz Jaleel : कव्वालीच्या कार्यक्रमात MIM नेते इम्तियाज जलील यांच्यावर उधळल्या नोटा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in